पीएमयुवाय विषयी

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.०

स्वच्छ ईंधन, बेहतर जीवन

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (एमओपीएनजी) मे २०१६ मध्ये ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' (पीएमयूवाय) एक महत्वाकांशी योजना लागू केली. जळाऊ लाकूड, कोळसा, गोवऱ्या इत्यादीं स्वयंपाकाच्या पारंपारिक इंधनाचा वापरामुळे ग्रामीण महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत असतो.

भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी बलिया, उत्तर प्रदेश येथे या योजनेचा प्रारंभ केला.

मार्च २०२० पर्यंत वंचित कुटुंबांना या योजने अंतर्गत ८ कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट होते.

माननीय पंतप्रधान महोदयांनी ७ सप्टेंबर २०१९ रोजी, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे ८ कोटीवे एलपीजी कनेक्शन बहाल केले.

उज्ज्वला 2.0: स्थलांतरित कुटुंबांना विशेष सुविधेसह PMUY योजनेअंतर्गत 1.6 कोटी एलपीजी कनेक्शनचे अतिरिक्त वाटप. उज्ज्वला 2.0 अंतर्गत कनेक्शनची लक्ष्य संख्या डिसेंबर 22 मध्ये गाठली गेली, अशा प्रकारे योजनेअंतर्गत एकूण कनेक्शनची संख्या 9.6 कोटी झाली.

भारत सरकारने PMUY योजनेंतर्गत अतिरिक्त 75 लाख कनेक्शन जारी करण्यास मान्यता दिली आहे, या योजनेअंतर्गत एकूण लक्ष्य 10.35 कोटीवर नेले आहे, ज्याच्या विरोधात आता कनेक्शन जारी केले जात आहेत.