उज्ज्वला २.० वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

दिनांक २०.०५.२१ च्या संदर्भपत्र क्रमांक एम- १३०१७ (११)/२/२०२१ -एलपीजी-पीएनजीनुसार एमओपीएनजीने पीएमयुवाय योजनेअंतर्गत एक कोटी एलपीजी कनेक्शन्स मंजूर केले आहेत. यासंदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत.


  • एसईसीसी सूची २०११ नुसार पात्र
  • जर आपण अनुसूचित जाती/जमाती, प्रधान मंत्री आवास योजना(पीएमएवाय) लाभार्थी असाल, अंत्योदय अन्न योजना (एएवाय), भटकी जमात, विशेष मागासवर्गीय (एमबीसी), चहा मळे कामगार किंवा माजी चहा मले कामगार, नदीच्या पाणलोट (बेट) क्षेत्रात राहणारे (लाभार्थींनी पुष्टी करण्यासाठी योग्य ते दस्तावेज सादर करावेत) असला तर
  • जर वरील दोन प्रकारांमध्ये महिलेचा समावेश होत नसेल तर, तर आपला दावा करण्यासाठी महिला १४ मुद्द्यांचे स्व-घोषणापत्र ज्यामध्ये ते कुटुंब गरीब कुटुंबामध्ये मोडते याची पुष्टी करण्यात येईल (दिलेल्या विहित नमुन्यामध्ये)

अर्ज करणाऱ्याने खालील दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे:

  • प्रमाणित नमुन्यामध्ये अर्जदाराचा फोटो आणि सही असलेले केवायसी.
  • पीओआय (ओळखपत्र दाखला)
  • पत्त्याचा दाखला
  • अर्जदाराचे आधारकार्ड प्रत,
  • शिधापत्रिकेत समावेश असलेल्या कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांचे आधार कार्ड किंवा त्यासोबत असलेले समकक्ष असलेले दस्तऐवज.
  • अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील
  • रेशन कार्ड किंवा राज्य सरकारने जारी केलेले इतर कोणतेही कौटुंबिक दस्तऐवज. /जिल्हा प्रशासन (जसे की राजस्थानमधील भामाशाह कार्ड आणि मध्यप्रदेशातील समग्रा आयडी, उत्तर प्रदेशचे परिवार रजिस्टर, हरियाणातील परिवार पेहचान पत्र, आंध्र प्रदेशचे तांदूळ कार्ड किंवा नंतर जोडले जाणारे इतर कोणतेही राज्य विशिष्ट कार्ड) ओळखल्या गेलेल्या कुटुंबाची माहिती देणारे ज्यामध्ये तिचे नाव दिसते. राज्यांमध्ये, जेथे राज्य सरकारच्या पोर्टलने कौटुंबिक तपशील अद्यतनित केले आहेत, स्व या पोर्टलवरील प्रिंटआउटची स्वाक्षरी केलेली प्रत लाभार्थी शिधापत्रिकेच्या बदल्यात देखील सादर करू शकतो.
  • स्थलांतरीत झालेल्या अर्जदाराच्या प्रकारात परिशिष्ट-१ नुसार कौटुंबिक सदस्य पुष्टी करण्यासाठी अर्जदाराचे घोषणापत्र.
  • अतिरिक्त दस्तऐवज, जर कनेक्शन खालीलपैकी कोणत्याही एका योजनेंतर्गत घेतले असेल तर (उदाहरणार्थ अनुसूचित जाती/जमाती, प्रधान मंत्री आवास योजना(पीएमएवाय) (ग्रामीण), अंत्योदय अन्न योजना (एएवाय), भटकी जमात, विशेष मागासवर्गीय (एमबीसी), चहा मळे कामगार किंवा माजी चहा मले कामगार, नदीच्या पाणलोट (बेट) क्षेत्रात राहणारे (लाभार्थींनी पुष्टी करण्यासाठी योग्य ते दस्तऐवज सादर करावेत).
  • अर्जदाराच्या स्वाक्षरीसह १४ मुद्द्यांचे विहित नमुन्यातील स्व-घोषणापत्र ज्यामध्ये ते कुटुंब गरीब कुटुंबामध्ये मोडते याची पुष्टी करण्यात येईल.

जर ग्राहकाकडे असलेल्या आधार कार्डवर त्यांना ज्या पत्त्यावर कनेक्शन हवे आहे तो पत्ता आणि आधार कार्ड वरील पत्ता एकच असेल तर, ओळखीच्या दाखल्यासाठी आणि पत्त्याच्या दाखल्यासाठी आधार कार्ड वापरता येते.

  • आसाम आणि मेघालय राज्य सोडून इतर राज्यांमध्ये अर्जदाराचे आधार कार्ड ओळखपत्राच्या दाखल्यासाठी (पीओआय) वैध समजले जाते
  • जर आधार कार्डवर अर्जदाराचा सध्याच्या रहिवासाचा पत्ता असेल तर पत्त्याच्या दाखल्यासाठी (पीओए) आधार कार्ड सुद्धा वापरता येते.
  • यदाकदाचित, अर्जदार राहत असलेला सध्याचा पत्ता आणि आधार कार्ड वरील पत्ता वेगळे असतील तर, महिला अर्जदार परिशिष्ट-अ नुसार पीओएसाठी इतर दस्तऐवज सादर करू शकतात
  • आसाम आणि मेघालय राज्यांसाठी, जेथे आधार कार्ड सक्तीचे नाही, अर्जदार खाली दिलेल्या तक्त्यांमधून इतर कोणतेही दस्तावेज ओळखपत्राच्या दाखल्यासाठी देऊ शकतात.
  • स्थलांतरित व्यक्तींच्या बाबतीत, ते पीओएच्या सूची मध्ये दिलेल्या २५ दस्तऐवजापैकी कोणतेही एक दस्तऐवज ज्यामध्ये परिशिष्ट-१ नुसार अर्जदाराचे स्वघोषणापत्राचा समावेश होतो, असे कागदपत्र सादर करू शकता,
  • जी व्यक्ती स्थलांतरित नाही अशा व्यक्तींसाठी परिशिष्ट १ नुसार केलेले स्वघोषणापत्र वैध ठरणार नाही.

अर्जदार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपले आवेदन करू शकतो.

  • ऑनलाइन- ग्राहक नोंदणीकरण ऑनलाइन आवेदन देऊन करू शकतो, किंवा अर्जदार महिला आपल्या नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन आवेदनसाठी संपर्क साधू शकतात.
  • ऑफलाइन- ग्राहक थेट वितरककाकडे जाऊन अर्जाद्वारे नोंदणी करू शकतात.

वितरकाने खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे:

  • ओळखपत्राचा दाखला (पीओआय(आवेदन पत्रातील सूचीनुसार कोणतेही एक दस्तावेज)
  • पत्त्याचा दाखला (पीओए(आवेदन पत्रातील सूचीनुसार कोणतेही एक दस्तावेज)
  • अर्जदाराचे आधारकार्ड (आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये आधार कार्ड सक्तीचे नाही, तरीसुद्धा राज्य सरकारने जारी केलेले शिधापत्रिका आवश्यक आहे)
  • सरकारने जारी केलेली शिधापत्रिका किंवा राज्य/जिल्हा प्रशासनाने जारी केलेले कोणतेही कौटुंबिक स्तरावरील दस्तावेज किंवा स्थलांतरित कुटुंबांसाठी परिशिष्ट-१ नुसार स्वघोषणापत्र आवश्यक
  • अर्जदाराच्या स्वाक्षरीसह १४ मुद्द्यांचे विहित नमुन्यातील स्व-घोषणापत्र.
  • जर लागू असेल तर अतिरिक्त दस्तावेज, क्यु (१) (ब) नुसार खाली दिलेल्या ७ श्रेणीमध्ये कनेक्शनसाठी अर्ज दिला तर अतिरिक्त दस्तऐवज सादर करावे लागतील.

वितरकाकडून ओएमसी पोर्टलमध्ये सादर करण्यासाठी आणि खात्री करण्यात येणारे दस्तावेज

  • सध्या अस्तित्वात असलेले केवायसी उज्ज्वला-२.० अनुरूप करायचे असल्यास ग्राहकाकडून सादर करण्यात येणारे घोषणापत्र. (मागील योजनेमधील केवायसी - योजनेसाठी पात्र होण्यासाठी पीएमयुवाय/ईपीएमयुवाय२ अंतर्गत असलेल्या निकषांची खात्री करण्यात येईल, हे आवेदक ग्राहकांकडून स्वघोषणापत्र सादर करतील)
  • ग्राहकांच्या गॅस वापरण्याच्या ठिकाणाचा जोडणी-पूर्व पाहणी अहवाल (फ्री इंस्टॉलेशन चेक रिपोर्ट)

असे लाभार्थी नोंदणी करू शकणार नाही. अशा प्रौढ व्यक्तीचे आधार नोंदणीकरण करण्यासाठी वितरक कुटुंबाला मदत करतील आणि आधार नावनोंदणीची पावती सादर करतील, त्यानंतर अर्जदार उज्ज्वला-२.० अंतर्गत नोंदणी करण्यास पात्र असतील. जर कुटुंबातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीचे निधन झाले, अशा स्थितीत या नियमांमध्ये सूट मिळेल किंवा लग्नामुळे एखाद्या सदस्याचे विलगीकरण झाले तर सूट मिळू शकेल. या स्थितीत पुरावा म्हणून मृत्यू प्रमाणपत्र किंवा लग्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

उज्ज्वला-२.० अंतर्गत अर्जदाराने सादर केलेले १४ मुद्द्यांचे स्वघोषणापत्र हा या योजनेसाठी पात्र होण्यासाठी मुख्य मापदंड आहे. तथापि, ते सर्व अर्जदारांसाठी अनिवार्य आहे.

शिधापत्रिका हा लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका उदा. एपील किंवा बीपीएल चा वापर करू शकतो.

होय, जर तेथे अतिरिक्त दस्तावेज जसे शिधापत्रिका असेल आणि त्या कुटुंबामध्ये ती व्यक्ती एकमेव प्रौढ सदस्य आहे याची खात्री दिली तर. जर शिधा पत्रिके मध्ये अतिरिक्त सदस्य असतील, आणि अशा सदस्याचे निधन झाले असेल तर त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा एखाद्या सदस्याचे लग्न झाले आणि अशी व्यक्ती कुटुंबातून विभक्त झाली त्यावेळी त्या व्यक्तीचे विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

नाही. पीएमयुवाय कनेक्शन हे फक्त गरीब कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावे जारी करता येते.

होय. उज्ज्वला-२.० अंतर्गत आधार पडताळणी बायोमेट्रिक पद्धतीने किंवा मोबाईलवरील ओटीपी च्या आधारे केली जाते, आसाम आणि मेघालय राज्यांमध्ये आधार पडताळणी वैकल्पिक आहे.

होय. अर्जदाराला कनेक्शन प्रदान केले जाईल, कारण उज्ज्वला-२.० या निकषांवर त्या महिला अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली असेल.

तथापि, अनुसूचित जाती किंवा जमाती साठी असलेले कनेक्शन अर्जदाराने सादर केलेल्या दस्तऐवजानुसार मान्य केले जाते.

होय, उज्ज्वला-२.० साठी पात्रतेचे सर्व नियम अर्जदाराने xi पूर्ण केले आहे उदाहरणार्थ- कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांचे आधारकार्डचे सादरीकरण आणि क्यू (६) नुसार अनिवार्य असलेल्या दस्तऐवजाचे सादरीकरण.

होय, याआधी अर्जदाराने सादर केलेला अर्ज पात्रतेच्या निकषाच्या आधारे सर्व टी पूर्ण करणारा हवा आणि त्या संदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रे स्वघोषणापत्रा सहित सादर करणे आवश्यक आहे त्यानंतरच पीएमयुवाय कनेक्शन चालू राहील.

जर कुटुंबामध्ये एखादा सदस्य वाढला तर ओएमसी मध्ये केवायसी केले जाईल.

शिधापत्रिकेवर याआधी केलेले केवायसी जर पडताळणी केले असेल अशा स्थितीत, शिधापत्रिकेतील बदल मान्य केला जाणार नाही. अशा स्थितीत ग्राहकांना नवीन केवायसी सादर करणे आवश्यक आहे.

होय, केवायसीच्या तारखेनुसार थेरेशन कार्डमध्ये दिसणारे वय आणि अर्जदाराकडून गोळा करावयाच्या सर्व प्रौढ कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील यांच्या आधारे प्रौढ कुटुंबातील सदस्यांची पडताळणी केली जाईल.

या प्रकरणात, अर्जदार आणि वितरकाकडून कुटुंबातील सदस्यांच्या तपशिलांसह त्यांच्या वयासह स्व-घोषणापत्र कुटुंबातील सदस्यांच्या आधार तपशीलासह सत्यापित केले पाहिजे. ही घोषणा अर्जदाराच्या शिधापत्रिकेसोबत अपलोड करणे देखील आवश्यक आहे. पुढे, अर्जदाराने केवायसी मध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व सदस्यांच्या आधारचे तपशील सादर करावे लागतील.

  • उज्ज्वला-२.० अंतर्गत असलेल्या पात्रतेसाठीचा मापदंड परिपूर्ण करून स्थलांतरित झालेल्या नवीन ठिकाणासाठी केवायसी पूर्तता होत असेल तर क्यु (२) नुसार पीएमयुवाय कनेक्शन जारी करता येऊ शकते. परंतु कनेक्शन हे नेहमी प्रौढ महिला सदस्यांच्या नावे जारी करण्यात येईल.
  • पीएमयुवाय अंतर्गत मिळणारी सबसिडी ही १४.२ किलोग्रॅम (१७०.४) सिलेंडरसाठी १२ वेळा मिळेल

नाही. कारण अर्जदार (सासू) यांच्या नावे आधीच एक कनेक्शन आहे, त्यांच्या नावे दुसरे कनेक्शन जारी करण्यात येणार नाही, पण त्या ही सुविधा स्थलांतरित झालेल्या नवीन शहरांमध्ये हस्तांतरित करू शकतात पत्ता बदल करण्यासाठी ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

होय. पीएमयूवाय कनेक्शन प्रधान करण्यापूर्वी, प्रमाणित नमुन्यानुसार ग्राहकांच्या घरी पूर्व-स्थापना परीक्षण करणे आवश्यक आहे. हे ओएमसीनुसार ग्राहकाच्या मोबाईल एप्लीकेशन द्वारे ओटीपीची खात्री करून प्रमाणित करण्यात येईल किंवा ग्राहक आणि वितरक यांची स्वाक्षरी घेऊन प्रत्यक्ष परीक्षण केले जाईल.

होय, एकटे राहत असणाऱ्या महिला सदस्याला कनेक्शन घेणे लागू असेल, पण यासाठी क्यू (२) नुसार असलेले मापदंड पूर्ण करावे लागतील.

अर्जदार १४.२ किलोग्रॅमच्या सिलेंडर किंवा ५ किलोग्रॅमचे एक सिलेंडर किंवा ५ किलोग्रॅमचे दोन सिलेंडर कनेक्शन निवडू शकतो.

होय, उज्ज्वला-२.० अंतर्गत, ओएमसी एलपीजी स्टोव्ह आणि पहिले रिफिल ग्राहकांना निशुल्क प्रदान करे. तथापि, उज्ज्वला-२.० अंतर्गत ग्राहकांना एलपीजी कनेक्शन साठी कोणतीही रक्कम अदा करण्याची गरज नाही.

अशा स्थितीत, महिला सदस्यांनी तिच्या कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांचे केवायसी जाहीर करणे आवश्यक आहे आणि तिच्या आधार कार्ड बरोबर आपल्या कुटुंबातील इतर प्रौढ सदस्यांचे आधार कार्ड सादर केले पाहिजे.

जर कुटूंबाचे विभाजन झाले असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे आधार मागील कंनेक्शन सोबत जोडलेले असेल, तर अर्जदाराने संबंधित वितरकाकडे किंवा ओएमसीकडे शिधापत्रिका सादर करून सध्याच्या कनेक्शन सोबत आधार कार्ड विलग करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक आहे. यानंतर, क्यू (६) नुसार अर्जदार सर्व दस्तऐवज जमा करू शकतो.

आरसी नुसार जर २ कुटुंबाचे कुटुंब प्रमुख एकच नाव असेल (जसे दोन भावांचे कुटुंब) तरीही कनेक्शन मान्य केले जाईल, या स्थितीत जरी सासू-सासरे कुटुंब प्रमुख यांनी आवेदन दिले नसेल तरीही कनेक्शन मान्य केले जाते. तथापि, अशा स्थितीत महिला अर्जदाराने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे केवायसी जाहीर करणे आवश्यक आहे आणि आपल्यासह कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांच्या आधार कार्डचा तपशील देणे आवश्यक आहे.